Janmashtami 2021 in Marathi || गोकुळाष्टमी महत्त्व ||

Information world
0

​जन्माष्टमी 

आजच्या दिवशी श्री कृष्णाची मूर्ती वाजत गाजत घरी आणल्या जाते, त्याची विधिवत स्थापना होतें, आजूबाजूला पेरलेले जव असतात, वरती फुलोरा असतो.
फुलोरा म्हणजे त्यात पात्या,  करंज्या, वेण्या, फण्या अनारसे आदी वस्तू एका विषष्ठ आकाराच्या लोखंडी कड्या असलेल्या स्टँड वर अडकवून ते श्रीच्या डोक्यावर लटकवून ठेवतात. काही ठिकाणी ते 5, 7,9 च्या आकड्यात असतात. तसेंच नारळ पण त्याच संख्येने लटकवून ठेवतात.
संध्याकाळी आरती, नैवेद्य असतो, रितीनुसार जेवणं करतात.
रात्री भजन, पूजनाचा कार्यक्रम असतो, बरोबर रात्री १२ वाजता "बाळकृष्णा चा"जन्म करतात. "सुंठवडा"प्रसाद म्हणून सर्वांना देतात.
दुसरे दिवशी सकाळी आरती, पूजा, नैवेद्य असतो. दुपारी 4 वाजता भजन असतं. तेव्हाच "गोपाळकाला" करतात.
संध्याकाळी पुनश्च आरती होतें व सर्वांना गोपालकाला दिल्या जातो. "हरीचा काला गोड, झाला गोपाळा ने गोड केला" अस म्हणतात आणि आनंदात ग्रहण करतात.
नंतर अक्षत घालून रात्री 7/8 वाजता मूर्ती हलवून त्यांची आरती होते आणि अशारितीने विसर्जनाची तयारी सुरू होते. वाजत गाजत, गुलाल उधळत विसर्जन एखादे तळ्यावर, अथवा विहिरीत होते.
विसर्जन करून आल्यावर पेरून ठेवलेले "जव"घरातील वडील मंडळींच्या डोक्यावर ठेवतात व त्यांना नमस्कार करतात.
अशारितीने हा उत्सव समाप्त होतो. पुढच्या वर्षी यायचं आश्वासन घेऊन विसर्जन होते, पुनरागमनायच अस म्हणत आपण पुढील वर्षी ओढीनं वाट बघतो.... अशा सांभाळून ठेवल्या जातात परंपरा !!

श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. सन २०२० मधील श्रीकृष्ण जयंती म्हणजेच जन्माष्टमी वा गोकुळाष्टमी कधी आहे? या दिवशी व्रताचरण कसे करावे? जाणून घ्या...


यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥... श्रावण महिन्यातील पौर्णिमेनंतर सर्वांना वेध लागतात, ते गोकुळाष्टमीचे. श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्ण हा श्रीविष्णूंचा आठवा अवतार मानला जातो.
बाललीला, नीती, मुसद्देगिरी, राजकारण, भगवद्गीता, मित्रत्व, प्रेम, त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णांचे नेहमीच स्मरण केले जाते. महाभारतकालीन अनेक गोष्टी, संदर्भ, व्यक्ती, प्रसंग, घटनांवर आजच्या काळातही संशोधन केले जात आहे. श्रीकृष्णांचे आचार, विचार, तत्त्वज्ञान हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिलेला आहे. सन २०२० मधील श्रीकृष्ण जयंती म्हणजेच जन्माष्टमी वा गोकुळाष्टमी कधी आहे? या दिवशी व्रताचरण कसे करावे? जाणून घ्या...
श्रीकृष्णांचा जन्माष्टमी उत्सव भारतभर साजरा केला जातो. श्रावण वद्य अष्टमी यंदा मंगळवार, ११ ऑगस्ट २०२० रोजी साजरी केली जाणार आहे. श्रीकृष्ण जयंती जन्माष्टमी, गोकुळाष्टमी आदी विविध नावांनी देशाच्या विविध भागात अनेकविध पद्धतीने साजरी केली जाते.
श्रावण वद्य अष्टमी प्रारंभ - ११ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ९ वाजून ०७ मिनिटे.
श्रावण वद्य अष्टमी समाप्ती - १२ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजून १५ मिनिटे.
श्रीकृष्ण जन्मोत्सव - ११ ऑगस्ट २०२० रोजी रात्रौ १२ वाजता.
जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून करावे. मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करावा. यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. यानंतर सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करावी. धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. श्रीकृष्णाची आरती करावी. पूजा करून पुरुषसूक्त, विष्णूसूक्ताचे स्तवन करावे. वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, पुराण, इतिहासातील निरनिराळ्या सत्कथा ऐकत रात्री जागरण करावे. गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला श्रवण करावे. यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा.

​जन्माष्टमी व्रताची सांगता

जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी. या दिवशी पंचोपचार करून उत्तरपूजा करावी. बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा. याच दिवशी काला करावा. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजे काला. हा कृष्णाला फार प्रिय होता. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत, असे मानले जाते. देशभरात प्रांताप्रमाणे व्रचारणाची पद्धत वेगवेगळी असू शकते. आपापल्या पद्धतींनुसार व्रताचरण करावे, असे सांगितले जाते.
wF8WzQ8iywY/XzI81gO91mI/AAAAAAAABVc/aR7R44CgNosmg_bccChRMKLdfFpPV3hYQCLcBGAsYHQ/s259/%25E0%25A4%259C%25E0%25A4%25A8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B7%25E0%25A5%258D%25E0%25A4%259F%25E0%25A4%25AE%25E0%25A5%2580%2B%25E0%25A4%2589%25E0%25A4%25A4%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B8%25E0%25A4%25B53.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">

​देशभरातील जन्माष्टमी उत्सव

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते. ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा साजरी केली जाते. गुजराथमध्ये 'सातम' म्हणजे सप्तमीच्या दिवशी विविध पद्धतीचे खेळ खेळले जातात आणि रात्री बारा वाजता कृष्णजन्माचा उत्सव साजरा करतात. मध्य प्रदेशात आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी तेथे भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. या दिवशी अनेकांच्या घरी गोकुळ, वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात. वृंदावनात दोलोत्सव असतो. या दिवशी रासलीलांचे सादरीकरण केले जाते.

​महाराष्ट्रात दहीहंडी


महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि उपनगरात एका विशिष्ट उंचीवर दही, दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते. यानंतर विविध मंडळाचे गोविंदा मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात. या दहीहंडीला साहसी खेळ म्हणून मान्यता मिळावी, यासाठी गेली काही वर्षे प्रयत्न केले जात आहेत. यंदा मात्र करोना संकटामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जवळपास सर्वच आयोजकांनी आपापले दहीहंडी उत्सव रद्द केले आहेत. जन्माष्टमीचे व्रत केल्याने अपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होते आणि आपल्या अपत्यांना दीर्घायुष्य लाभते, अशी धारणा आहे.


गोकुळाष्टमी , दही हंडी
जेव्हा अधर्म, अत्याचार, अनिती ह्यांचा कडेलोट होतो, त्यावेळी भगवंत अवतार घेतो. त्यावेळी ही तसंच झालं.
मथुरेचा राजा कंस ह्याच्या अधर्म, अत्याचार, अनितीला जेव्हा प्रजा त्रासली. कंसाने काय केले नाही, त्याने आपली बहिण देवकी आणि तिचा पती वसुदेव ह्यांना बंदीशाळेत टाकले. कां तर तिच्या पोटी जन्माला येणारा पुत्र हा तुझा वध करील ही आकाशवाणी त्यानं ऐकली होती. आपला शत्रू जन्मताच नाहिसा करायचा, मारून टाकायचा, म्हणून कंसान देवकीची बाळ मारून आपल्या माथी बाल हत्येच पाप घेतलं. बालकाची निर्घुण हत्या केली, तेव्हा देवकीपोटी आठव्या बालकाच्या रूपाने भगवान महाविष्णू ह्यांनी श्रीकृष्ण रूपाने आठवा अवतार घेतला.
श्रावण वध अष्टमी हा श्रीकृष्णाचा जन्म दिवस. श्रीकृष्ण ही भारतीयांची लाडकी देवता. त्यामुळे गोकुळाष्टमी-कृष्णाष्टमीचा हा उत्सव मोठ्या थाटामाटाने सर्वत्र साजरा केला जातो. मंदिरातून आरास केली जाते. रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा केला जातो. भजन, पूजन, कीर्तन इ. अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. गोकुळाष्टमीचा उपवास हा त्या दिवशी सोडला जात नाही तर तो दुसर्‍या दिवशी सोडतात. त्यालाच कृष्णाष्टमीचे पारणे असे म्हणतात.
कृष्ण हा भगवान महाविष्णू ह्यांचा आठवा अ वतार. त्या अवताराची प्रगटन तिची अष्टमीच. ह्या अवताराच प्रमुख कार्य म्हणजे धर्म रक्षण, भक्त भाविक सज्जन ह्यांच रक्षण अन दुर्जनांना शासन करणं हेच होय. कौरव पांडवाच्या मधलं ते महाभारत घडू नये म्हणून श्रीकृष्णाने खूप प्रयत्न केले, पण…अखेर कृष्णाला सत्याच्या बाजूने, धर्माच्या बाजून म्हणजेच पांडवांच्या बाजूनेच युद्धांत उतरावे लागले. पांडवाच्या बाजूने राहून श्रीकृष्णा अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले. कपटी अन‌ कुटिल कारस्थानी कौरवांचा पराभव केला.
श्रीकृष्णाने बालपणी गोकुळ वृंदावनातील असंख्य गोप-गोपींना आपल्या रूपाने आकर्षित केले. मधुर बासरीने वेड लावले. दुष्ट कंसाचा वध केला. कालिया मर्दन केले. गोवर्धन पर्वत एका करंगळीवर उचलून इंद्राचे गर्वहरण केले. गोकुळचा हा दही, दूध, लोणी चोरणारा कृष्ण, कधी लोकांचा चित्तचोर झाला हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही.
श्रीकृष्ण चरित्र हा एक स्वतंत्रपणे अभ्यासाचा, अनुकरणाचा विषय आहे. अर्जुनाचे निमित्त करून उभ्या मानव जातीचे कल्याण व्हावे म्हणून त्यांना गीतामृत पाजणारा तो हा कृष्णच. मूठभर पोह्यांसाठी आपल्या मित्राला सुवर्ण नगरी करून देणारा हा कृष्णच. तो असा अर्जुनाचा सखा, मार्गदर्शक तसाच भोळ्या भावड्या भक्ताचा संरक्षक-मार्गदर्शकही. त्या दुष्टांच्या संहारकाची आणि सज्जन भक्त भाविकांच्या संरक्षकाची आपल्याला सदैव आठवण रहावी. तो आठवा श्रीहरी आपण आठवावा म्हणून हा कृष्ण जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो.

दुसर्‍या दिवशी शहरात, गावा-गावांत, चौका-चौकांत दही हंडी लावली जाते. कृष्ण नामाच्या गजरांत ती फोडली जाते. आनंदोत्सव साजरा केला जातो. नवयुवकांसाठी हा एक विलक्षण उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस असतो.

2020 कृष्ण जन्माष्टमी
जन्माष्टमी उपवास ठेवणारे भक्त जन्माष्टमीच्या आधी दिवसातून एकदाच खातात. उपोषणाच्या दिवशी स्नान करून निवृत्तीनंतर इत्यादी दिवशी, भाविक दिवसभर उपवास ठेवतात, रोहिणी नक्षत्र व अष्टमी तिथी संपल्यानंतर दुसर्‍या दिवशी उपवास करण्याचे व्रत करतात. काही कृष्ण-भक्त फक्त रोहिणी नक्षत्रानंतर किंवा अष्टमी तिथीनंतरच व्रत ठेवतात. सकाळी ठराव घेण्यात आला आणि ठरावासोबत अहोरात्र उपोषण सुरू होते.

जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण पूजा सर्वोत्तम वेळी केली जाते. वैदिक काळाच्या गणनेनुसार, निशिथ हा मध्यरात्रीचा काळ आहे. श्री बालकृष्णांना भाविक योग्य वेळी प्रार्थना करतात. षोडशोपचार पूजेच्या सर्व सोळा (14) चरणांचा विस्तारित विधी पूजेमध्ये समावेश आहे. जन्माष्टमीची विस्तृत पूजा विधि वैदिक मंत्रांसह जन्माष्टमी पूजा विधी पानांवर उपलब्ध आहे.
कृष्णा जन्माष्टमीवर उपवास करण्याचे नियम
एकादशीच्या उपवासाच्या वेळी पाळले जाणारे सर्व नियम जन्माष्टमी उपवासातही पाळावेत. म्हणून, जन्माष्टमी उपवास करताना अन्नधान्य घेऊ नये. दुसर्‍या दिवशी सूर्योदयाच्या नंतर ठराविक वेळी जन्माष्टमीचे व्रत मोडले जातात, ज्याला जन्माष्टमीच्या पाराना काळाने ओळखले जाते.
जन्माष्टमी सूर्योदय अष्टमीच्या तारखेनंतर आणि रोहिणी नक्षत्र संपल्यानंतर साजरी केली पाहिजे. जर अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र सूर्यास्त होईपर्यंत संपत नसेल तर पराना कोणत्याही संपल्यानंतर होऊ शकतो. जर अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र जर सूर्यास्त होईपर्यंत संपत नसेल तर दिवसा जन्माष्टमी उपवास खंडित होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कोणत्याही उपवासानंतरच उपवास खंडित करावा.
म्हणून अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्राच्या आधारे कृष्णा जन्माष्टमी उपवास दोन दिवस पूर्ण केला जाऊ शकतो. हिंदु धर्मग्रंथ धर्मसिंधुनुसार, जे लोक भक्त सलग दोन दिवस उपवास करू शकत नाहीत ते जन्माष्टमीच्या दुसर्‍याच दिवशी सूर्योदयानंतर उपवास खंडित करू शकतात.
कृष्णा जन्माष्टमीला कृष्णाष्टमी, गोकुळाष्टमी, अष्टमी रोहिणी, श्री कृष्ण जयंती आणि श्री जयंती म्हणूनही ओळखले जाते.
कृष्णा जन्माष्टमीच्या दोन वेगवेगळ्या दिवसांबद्दल
बहुधा कृष्णा जन्माष्टमी दोन वेगवेगळ्या दिवशी होते. जेव्हा जेव्हा हे घडते तेव्हा जन्माष्टमी स्मारता पहिल्या दिवशी संप्रदायाच्या लोकांसाठी असते आणि दुसर्‍या दिवशी जन्माष्टमी वैष्णव लोकांसाठी असते.
बहुतेक वेळा उत्तर भारतातील भक्त स्मारक आणि वैष्णव जन्माष्टमी यांच्यात भेद करीत नाहीत आणि दोन्ही समुदाय एकाच दिवशी जन्माष्टमी साजरा करतात. आमच्या मते ही सहमती इस्कॉन संस्थेमुळे आहे. "इंटरनॅशनल कम्युनिटी फॉर कृष्णा कॉन्शियस" ची संस्था, ज्याला इस्कॉन म्हणून ओळखले जाते, ही वैष्णव परंपरा आणि तत्त्वांच्या आधारे तयार केली गेली आहे. म्हणूनच, इस्कॉनचे बहुतेक अनुयायी वैष्णव पंथाचे लोक आहेत.
इस्कॉन ही एक सर्वात व्यावसायिक आणि जागतिक धार्मिक संस्था आहे जी इस्कॉन संस्कृतीला चालना देण्यासाठी भरपूर पैसा आणि संसाधने खर्च करते. म्हणूनच, इस्कॉनच्या व्यावसायिक परिणामामुळे आणि जाहिरातींमुळे, बहुतेक भाविक इस्कॉनने निवडलेली जन्माष्टमी साजरी करतात. इस्कॉनची परंपरा वेगळी आहे आणि जन्माष्टमी साजरी करण्याचा सर्वात योग्य दिवस इस्कॉनपेक्षा वेगळा असू शकतो याची जाणीव वैष्णव पंथाचे अनुयायी नसलेले भाविकांना नसतात.
स्मरता अनुयायी, ज्यांना स्मारक आणि वैष्णव धर्मातील फरक माहित आहे, जन्माष्टमी उपवासासाठी इस्कॉन दिनाचे अनुसरण करीत नाहीत. दुर्दैवाने ब्रज प्रदेश, मथुरा आणि वृंदावनमध्ये इस्कॉनने ठरविलेल्या दिवसाचे सर्वानुमते पालन केले जाते. इतरांना पाहून जन्माष्टमीचा दिवस पाळणारे भाविक हा इस्कॉनने ठरविलेला दिवस मानला आहे.
जे लोक वैष्णव धर्माचे अनुयायी नाहीत, ते स्मारक पंथाचे अनुयायी आहेत. धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू या हिंदू धर्मग्रंथांमध्ये, स्मारकाच्या अनुयायांसाठी, जन्माष्टमीचा दिवस निश्चित करण्याचे स्पष्ट नियम आहेत. हिंदू धर्म ग्रंथात नमूद केलेल्या नियमांच्या आधारे जे भाविक वैष्णव पंथाचे अनुयायी नाहीत त्यांनी जन्माष्टमीचा दिवस ठरवावा. हा फरक समजून घेण्यासाठी एकादशी व्रत ठेवणे हे एक उत्तम उदाहरण आहे. एकादशी व्रत ठेवण्यासाठी, स्मरता आणि वैष्णव पंथांचे भिन्न नियम आहेत. बहुतेक भाविकांना एकादशीच्या वेगवेगळ्या नियमांची माहिती आहे पण जन्माष्टमीच्या वेगवेगळ्या नियमांविषयी ते अज्ञानी आहेत. वेगवेगळ्या नियमांमुळे, एकादशीच्या दिवशीच नव्हे तर जन्माष्टमी आणि राम नवमीमध्येही एक दिवसाचा फरक आहे.
वैष्णव धर्मावर विश्वास ठेवणारे लोक अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र यांना प्राधान्य देतात आणि सप्तमी तिथीवर ते कधीही जन्माष्टमी साजरा करत नाहीत. वैष्णव नियमांनुसार जन्माष्टमीचा दिवस हिंदू कॅलेंडरमध्ये अष्टमी किंवा नवमी तारखेला येतो.
जन्माष्टमीचा दिवस ठरविण्यासाठी स्मार्ट समुदायाद्वारे केलेले नियम अधिक क्लिष्ट आहेत. या नियमांमध्ये हिंदु मध्यरात्र असलेल्या निशिता काळाला प्राधान्य दिले जाते. ज्या दिवशी अष्टमी तिथी निशिता काळात प्रचलित होते त्या दिवसाला प्राधान्य दिले जाते. या नियमांमध्ये रोहिणी नक्षत्र समाविष्ट करण्यासाठी आणखी काही नियम जोडले गेले आहेत. जन्माष्टमी दिनाचा अंतिम निर्धार
more photo click now 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)